आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ५)
स्वाईन फ्ल्यु हा सध्या चर्चेत असलेला आजार. एक समज असा असतो की हल्लीच आढळणार्या ह्या आजारासाठी आयुर्वेदात औषधे कशी असतील? ह्या आजाराला आयुर्वेदात काय नाव आहे? हा आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येईल का? औषधे असलीच तर ती किती प्रभावी ठरतील? मागे हेच प्रश्न चिकुनगुनिया ह्या आजाराबद्दल विचारले जात होते.. antibiotics हाच एक पर्याय माहीत असलेल्या व्यक्तींकडून हे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत..
आयुर्वेदात प्रत्येक आजाराचे नाव स्पष्टपणे आले नसले तरी आजारात जी लक्षणे आढळतात व शरीरात जे बदल घडतात त्यावरुन pathogenesis म्हणजे शरीरात आजार नेमका कसा निर्माण झाला, शरीरातील रचना, अवयव व त्यांच्या क्रिया ह्यात कोणते बदल झाले त्याचा ठोकताळा मांडता येतो. त्यावरुन त्या आजाराच्या लक्षणांचा अन त्या लक्षणांमागील कारणस्वरुप असलेल्या घटकांचा एकत्रित विचार केला जातो. आयुर्वेदात ताप म्हणजे ज्वराचे प्रकार वर्णन केलेले आहेत. स्वाईन फ्ल्यु, चिकुनगुनिया ह्या सारख्या आजारात आढळणारी अन्य लक्षणे विचारात घेऊन आयुर्वेदात सांगितलेल्या तापाच्या वर्गिकरणानुसार योग्य तो प्रकार शोधता येतो. अन त्यानुसार चिकित्सा केली जाते.. अगदी मलेरिया, टायफॉईड अशा आजारांवरही आयुर्वेदिक औषधे योग्य उपाय ठरत आहेत.. चिकुनगुनिया ह्या आजारात रास्नासप्तक काढा, महारास्नादी काढा ह्यासारखे काढे वैद्यांच्या सल्ल्यानुसार आजार बरा झाल्यवरही ज्या रुग्णांनी नियमित घेतले त्या रुग्णांमधे त्या आजाराचे सांधेदुखीसारखे कुठलेही उपद्रव complications नंतर शिल्लक नव्हते..
आयुर्वेदिक औषधांनी स्वाईन फ्ल्यु बरा होऊ शकतो का ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे.. रोगाचे निदान उशिरा झाले अथवा अन्य उपद्रव शरीरात दिसण्यास सुरुवात झाली असेल, अन्य औषधांमुळे काही complications झाली असतील तर त्या स्थितीत औषधोपचाराचा किती फायदा होईल हे प्रत्येक रुग्ण व त्याच्यात आढळणारी complications ह्यावर अवलंबून आहे. निदान उशिरा झाले तर आत्ययिक चिकित्सा म्हणजे emergency management मिळूनही अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो. म्हणून कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे, इतरांनी सुचवलेले उपाय वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेत राहणे हेही त्रासदायक ठरु शकते. स्वाईनफ्ल्युचे त्वरीत निदान करुन घेऊन आयुर्वेदिक औषधे चालू केली तर पूर्ण आराम नक्कीच येऊ शकतो. आजाराला आयुर्वेदात काय म्हणतात हे शोधून स्वतः उपाय करत बसण्यापेक्षा वैद्याकडून योग्य निदान करुन घेऊन त्वरीत उपचार घेणे हेच लाभदायक. वृत्तपत्रातून स्वाईन फ्ल्युची लागण दूर ठेवण्यासंदर्भात अनेक मार्गदर्शक असे आयुर्वेदिक सल्ले येत असतात.. त्यापैकी आपल्याला कोणते उपयुक्त ठरु शकतील ह्याची माहिती आपल्या वैद्याशी संपर्क साधून करुन घेणे हे योग्य.
सध्या अनेक साथीचे रोग पसरत आहेत.. त्यापैकीही बर्याच आजारांवर आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरतात.. जसे, गोवर, कांजिण्या, मलेरिया, टायफॉईड, डोळे येणे, कॉलरा, इत्यादी. आपल्या परिसरात ज्या साथीच्या रोगाचे प्रमाण जास्त असेल अथवा ज्या साथींचे रोग गेल्या काही वर्षात आपल्या परिसरात सातत्याने आढळत आहेत त्याबद्दलची आयुर्वेदिक उपचारांची वा प्रतिबंधक उपायांची माहिती आपल्या वैद्यांकडून करुन घेणे आवश्यक आहे.. जसे, डोळे येणे ही साथ पसरत असेल तर रोज सकाळी त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुणे हा एक चांगला प्रतिबंधात्मक उपाय ठरतो. त्रिफळा चूर्ण विकत मिळते ते १ चमचा घेऊन वाटीभर पाण्यात भिजत ठेवायचे रात्रभर. सकाळी स्वच्छ सुती वस्त्राने ते पाणी न हलवता गाळून घ्यायचे अन त्याने डोळे धुवायचे. चूर्ण मात्र खात्रीशीर दुकानातून घ्यावे. तुळस, धणे, जिरे, काळी मिरी, पिंपळी, ओवा, बेलफळ, सुंठ अशी काही औषधे वैद्यकीय सल्ल्याने घरी नेहमी ठेवावीत.
आजार होऊ नयेत म्हणून ज्या गोष्टींचे नियमित पालन करायचे त्या म्हणजे आपला आहार, झोप, दिनचर्या, ऋतुनुसार आवश्यक ते बदल अन पथ्य सांभाळणे म्हणजेच ऋतुचर्या…
आहार : शक्यतो घरचे जेवणच रोज घ्यावे. रस्त्यावरील पदार्थ कटाक्षाने टाळावे. घरच्या जेवणात रात्री फुलके, भाकरी ह्यांचा समावेश असावा. पावसाळ्यात कडधान्ये शक्यतो कमी प्रमाणात खावी, अपवाद मूग. पालेभाज्या पण स्वच्छ, निवडलेल्या असाव्या. फळभाज्या दुधी, कोबी, फ्लॉवर, तोंडली, पडवळ, दोडके, भेंडी ह्यासारख्या नियमित घ्याव्या. आंबलेले पदार्थ, दही, मांसाहार विशेषतः मासे पूर्ण बंद करावे. आंबट पदार्थ, तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खावे.
तसेच, सकाळी रिकाम्या पोटी, रात्री झोपताना जास्त पाणी पिऊ नये.. उगीच ठरवून सतत पाणी पीत राहणे हेही टाळावे.. शरीराला पाण्याची आवश्यकता आहे ह्याची जाणीव तहान लागल्यावर शरीर करुन देत असतेच, असे असताना अतिरिक्त व अनावश्यक प्रमाणात पाणी का प्यावे?? शरीर म्हणजे काही ‘ड्रेनेज सिस्टिम‘ नव्हे, वरुन पाणी प्यायले की सगळ्या सिस्टीम्स स्वच्छ अन मळ शरीराबाहेर.. प्यायलेले पाणीही शरीराला आधी पचवावेच लागते. मग त्यातील आवश्याक भाग शरीरात काम करतो. उगाच जास्त पाणी पिऊन अंगावर, पायावर सूज येऊ शकते तसेच असलेली सूज वाढूही शकते..
झोप : रात्री ६ ते ८ तास शंत, तणावरहीत झोप आवश्यक असते. पावसाळ्यात दुपारी झोपणे कटाक्षाने टाळावे. रात्रीही जेवल्यानंतर लगेच झोपु नये.
ही सगळी काळजी ऑक्टोबर महिना संपेपर्यंत घेणे आवश्यक आहे.
ह्याचबरोबर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे आपला परिसर नेहमीच स्वच्छ राहील ह्याबाबत पुरेसे दक्ष असणे. घराबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे..

I appreciate your information.Ayurveda is encient and may be tested true for few conditions. It is far more genuine than homeopathy which is placebo at the best and quackery at worst.
But overall,the ambiguity in it is too dangerous to beging ayurvedic therapy for maleria,swine flu etc. Potentially fatal to rely on it as it will deprive you of emergency care that these acute diseases need.
ngadre
जुलै 31, 2010 at 18:58
मी आधीच सांगितले आहे की सुरुवातीच्या स्थितीत आयुर्वेद निश्चितच लाभदायक ठरतो. पण अगदी मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारामध्ये सुद्धा.. हे केवळ एक मत नाही आहे, अशा रुग्णंना स्वतः औषधे देऊन बरे होताना पाहिले आहे.. तसेच काही जुन्या वैद्यांकडे असे रुग्ण पूर्ण बरे झालेले प्रत्यक्ष पाहिले आहेत..
अर्थात emergency च्या वेळी आधुनिक सपोर्ट्स, सिस्टीम्स ची मदत नक्कीच घ्यावी लागते, इथे ह्या लेखात ते अजिबात अमान्य नाहीये.. पण उद्देश हा आहे की आजार वाढल्यानंतर आयुर्वेदाकडे वळून काही उपाय होईल का हे शोधण्यापेक्षा सुरुवातीच्या अवस्थेत आल्यास निश्चितच जास्त लाभ होऊ शकतो.. हे लेख लिहिण्याचा उद्देश आधुनिक वैद्यकविरोधी नसून आयुर्वेद हा लोकांच्या मनात समजूतींच्या एका विशिष्ट साच्यात अडकला आहे, तो साचा काही प्रमाणात दूर करणे हा आहे..
medhasakpal
ऑगस्ट 1, 2010 at 06:53
ayurvedacha DMD (Duchenin Muscular Dystrophy ) war upayog hoilka?
shrinand yeshwant kulkarni
मे 25, 2011 at 10:14